मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. ज्यानंतर खळबळ उडाली. मोठा कट रचण्यात आल्याचे यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. सरकारने मराठे संपवण्याचा कट रचल्याचे जरांगे यांनी म्हटले.
राज्यात सरकारपासून एक कट शिजला गेला. फडणवीस आणि शिंदे यांच्या मंत्र्यांकडून कट शिजला जात आहे. नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि रद्द सुद्धा त्यांनीच करायच्या. मी एकटा पडावा म्हणून सरकारने जाणून बुजून कट रचला. पुरेपूर आणि नियोजित कट सरकारकडून रचला गेला. मी सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. सरकारने निवडून मराठ्यांकडून यायचं आणि नंतर मराठ्यांचा घात करायचा. आम्ही 2029 ला सर्वात मोठा बदला घेऊ, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की,ज्योती शिंदे यांचं प्रमाणपत्र तुम्ही कायमच रद्द करा. प्रचंड गैरसमज निर्माण केला गेला. राजकीय द्वेष्यातून रद्द केले. फडणवीस तुम्ही विनाकारण मराठे अंगावर घेतायत, बावनकुळे रद्द करायला सांगतात. यशवंता दहीहंडे यांची उर्दू मधील नोंद सापडली आहे. हिच नोंद ग्रामपंचायतमध्ये लावली आहे.
तुमचा म्हणजे BJP निवडून आला नाही म्हणून तुम्ही फोन करून रद्द करायला लावला. जरांगे पाटील लोकप्रतिनिधी यांचे पुरावे दाखवताना संतप्त झाले आहे. सरकारच्या एकाही अधिकाऱ्याकडे इतके पुरावे नसतील, जेवढे दाखवत आहेत. बावनकुळे यांनी सांगितलं की नोंदी रद्द करा. त्यांनी पत्र दिले. आता सरकारवर जोरदार टीका जरांगे यांनी केली
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे मंत्रीच हे प्रमाणपत्र रद्द करायला सांगत असल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. यासोबतच 2029 मध्ये सांगू असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. सरकारला मोठा इशारा त्यांनी दिला. आमच्याकडे पुरावे असूनही प्रमाणपत्र बोगस का म्हणतात, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी यादरम्यान उपस्थित केला. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खोटे प्रयोग करून नुकसान करू नका, असेही त्यांनी म्हटले.
