नागपूर: महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या थडग्यावरील वादाच्या संदर्भात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले. यानंतर नागपूर पोलिसांनी सर्वांना अटक केली. अलीकडेच महाराष्ट्र पोलिसांनी या सर्वां विरुद्ध एफ आय आर नोंदवला होता. नागपूर मध्ये कोतवाली पोलिसांसमोर आठ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले. यानंतर सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले.
तसेच तिकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर दंगल प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही असे सांगून पोलिसांवर हल्ले करणाऱ्या आरोपींना कबरीतून शोधून काढू असे यावेळी फडणवीस म्हणाले.
