मुंबई: राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘एक राज्य एक गणवेश’ योजना बंद केली आहे. यापुढे राज्यातील सर्व शासकीय शाळांसाठी एकसमान गणवेश असणार नाही, तर प्रत्येक शाळेला आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषेचा रंग आणि डिझाइन निवडण्याचा अधिकार देण्यात आला आहे. हा निर्णय लवकरच, म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षापासून अंमलात आणला जाईल.

या योजनेमुळे शाळांना आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार गणवेशाची रचना करता येईल. तथापि, शासकीय शाळांमध्ये मोफत शालेय वेशभूषा वितरणाच्या प्रक्रियेत अजूनही चढ-उतार चालू आहेत. सरकारच्या या नवीन धोरणामुळे शैक्षणिक संस्थांना अधिक स्वायत्तता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

सरकारने घेतलेल्या या निर्णयावर पालकांतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!