मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका मेसेजचा स्क्रिनशॉट ट्विट केलाय. या मेसेसमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. एका ग्रामपंचायतीच्या गटनेत्याने अंजली दमानिया यांना हा मेसेज पाठवला आहे. तानाजी सावंत यांच्या माणसांपासून आपल्याला धोका आहे. त्यांच्याकडून आपल्याला मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप गटनेत्याने केला आहे. अंजली दमानिया यांनी याबाबतचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. “आमदार तानाजी सावंत. ह्या रत्नदीप चव्हाणांच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. बंद करा आता दादागिरी आणि दहशत”, असं अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“ताई मी रत्नदीप शिवाजी चव्हाण बोलत आहे. मी वाल्हा सामनगाव ग्रामपंचायतचा गटनेता आहे. ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आल्यापासून आमदार तानाजी सावंत यांचे लोक, तसेच तालुका कृषी सभापती यांनी काल मला अमानुषपणे मारहाण केली. ताई मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. मी खूप दहशतीत आहे. माझे प्राण वाचवा. माझ्या विरोधात तक्रारही घेत नाहीत. पोलीस स्टेशनचे लोक त्यांना स्वतःच्या दबावपोटी एफआयआर घेत नाहीत. भूम तालुका पोलीस स्टेशन जिल्हा धाराशिव. ताई माझे प्राण वाचवा मी खूप दहशतीत आहे”, असा मेसेज अंजली दमानिया यांना पाठवण्यात आला आहे.

रत्नदीप चव्हाण यांनी तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपांवर तानाजी सावंत यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाते? ते पाहणं महत्त्वाचं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून काही दखल घेतली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!