पुणे: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीहक्कासंबंधीच्या समस्यांवर मात करण्यासाठी जिवंत सातबारा’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे ७/१२ उताऱ्यावरील मृत खातेदारांच्या नावांची नोंद काढून त्याऐवजी वारसांची नावे लावण्याची प्रक्रिया वेगवान केली जाईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
मोहिमेचे उद्देश:
– वारस नोंदणी प्रक्रियेतील अडचणी दूर करणे.
– मृत व्यक्तींच्या नावावर असलेल्या जमिनी वारसांकडे सहज हस्तांतरित करणे.
– शेतीच्या खरेदी-विक्री, कर्जप्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांना तोड देणे.
– कायदेशीर वादटंचा टाळणे.
मोहिमेचा कालावधी व चरण:
– १ ते ५ एप्रिल २०२५: तलाठ्यांद्वारे मृत खातेदारांची यादी तयार करणे व चावडीवर जाहीर करणे.
– ६ ते २० एप्रिल: वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे.
– २१ एप्रिल ते १० मे: ई-फेरफार प्रणालीद्वारे वारसांची नोंदणी.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
– मृत्यू दाखला, रहिवासी पुरावा.
– वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र.
– पोलिस पाटील/सरपंच/ग्रामसेवक यांचा दाखला.
– सर्व वारसांची माहिती (नाव, वय, संपर्क).
महत्त्वाचे सूचना:
– ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. दलाल किंवा अधिकाऱ्यांना पैसे देऊ नयेत.
– प्रशासनाच्या तहसीलदार, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या देखरेखीखाली मोहीम पार पाडली जाईल.
या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे अधिकृत हक्क सहज मिळतील, ज्यामुळे शेतीव्यवसायास गती येण्याची अपेक्षा आहे.
